Skip to main content

अतिसार/ डायरिया



प्रत्येक ऋृतू बदलला की, वातावरणात बदल होतो.त्याचा परिणाम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होतो. त्यात लहान मुलांची जास्त काळजी घ्यायची गरज असते. तर बघुया अतिसार (डायरिया) काय आहे.
अ तिसार (डायरिया) यात शरिरातील पाणी आणि मिनरल निघून गेल्याने पोषण मिळत नाही. हा खाण्या पिण्याच्या पदार्थामधून शक्यतो होतो. प्रदूषित पाणी, फळे, अन्न हे याचे मुख्य कारण आहेत. अन्नाच्या किंवा पाण्याच्या यामाध्यमातून पोटात बॅक्टिरिया (जिवाणू)गेल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. या व्यतिरिक्तही अतिसाराची कारणे आहेत. जसे भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, कमी झोप. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे अतिसार झाल्याचे प्रमाण जात असतेे.
डायरियाची सुरुवात पोटात थोडे दुखणे सुरु होते नंतर त्याचे प्रमाण वाढते. संडास कधी घट्ट तर कधी पातळ होते. हात पाय दुखायला लागतात. अशक्तपणा येतो. मळमळ, उलट्या होतात. यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होवून मृत्यू सुद्धा होउ शकतो.
लहान मुलांना पाच पाच मिनिटांतून पातळ संडास होते. त्यामुळे त्यांच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. म्हणून त्यांची काळजी घ्यावी, ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
डायरियाची काळजी घेताना शिळे अन्न, तेलकट, पचायला जड, जास्त मसाल्याचे पदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दूषित पाणी हे टाळा. ताजे अन्न खा. आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखा, नखे वाढवू नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
डायरियात हलके अन्न खावे. भात, मोसमी फळे खावीत. दूध व दूधजन्य पदार्थ शक्यतो टाळावी डायरित ती पाचायला जड असतात. यामध्ये शरिराला आरामाची खुप आवश्यकता असते. त्यामुळे आराम करावा.
डायरियाचे तीन प्रकार आहेत : 1. व्हायरल 2 बॅक्टीरिअल 3 प्रोटोजोअल व्हायरल हा सामान्य असतो, तर बैक्टीरिअल हा बॅक्टीरिपासून तर प्रोटोजोअल हा अमिबापासून होतो. बॅक्टीरिया आणि प्रोटोजोअल हे दोन खुप घातक असतात. यावर उपाय केला नाही तर यापासून मृत्यू सुद्धा होउ शकतो.
अतिसार असताना हे करा...!
हलके अन्न खा
मोसमी फळे खा
उकळलेले पाणी प्या
हात स्वच्छ धुवा
तळलेले अन्न टाळा
मांस/जड अन्न टाळा
अल्कोहोल टाळा
अतिसाराचे प्रमाण जास्त असेल तर लवकर डॉक्टरांकडे जावे. त्यावर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होउ शकतो

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...