Skip to main content

भविष्यासाठी जल बचतीचे उपचार करणारी खेडी आजपासून पुढील 45 दिवस अहोरात्र श्रमदान करणार


जल है तो कल है
या उक्तीप्रमाणेच पाणी नसेल तर? असा विचार जरी आला तर मनात धडकी भरते. असा काळ आपल्या पुढील पिढीसाठी पर्यायाने आपल्यासाठी येणार नाही याची काळजी तर आपणालाच घ्यायला हवी. पाण्याविणा काय हाल होतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे.
याचे गांभिर्य लक्षात घेता, आता पाण्याचे महत्वही तेवढेच कळून चुकले आहे. गावागावातून पाण्याची साक्षरता होत आहे. यात मोलाचे काम करत आहे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामुहिक श्रमदानातून जलसंवर्धनाच्या कामांना तेल्हारा तालुक्यात  सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12.00 वाजता स्पर्धेची नियोजीत 8 तारीख सुरू होताच पिवंदळ, वारखेड, गाडेगाव, दानापूर, करी रुपागड, बोरव्हा, चिचारी इत्यादी गावांमध्ये जलसंवर्धनाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. रात्रीची वेळ असुनही गावकऱ्यांनी एकजूटीचे प्रदर्शन करीत मोठ्या संख्येने या सार्वजनिक हिताच्या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.पहिल्याच दिवशी ओसांडून वाहणारा उत्साह पुढील 45 दिवस संपूर्ण गावकऱ्यांमधे जोश भरणारा नक्कीच असेल. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच गावागावांमधे तुफान आल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यासाठी जल बचतीचे उपचार करणारी खेडी आजपासून पुढील 45 दिवस अहोरात्र श्रमदान करणार आहेत.
(सौजन्य : जागर फाउंडेशन)

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...