Skip to main content

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठेवी शरिराला निरोगी


आपल्याकडे देवाला तांब्याच्या भांड्यातील पाण्याने अंघोळ घातली जाते. हे खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे. त्याचा विचार केला असता त्यात सायंटीफीक कारण दडलेले आहे, हे नक्कीच आहे.
प्रत्येक क्षेत्रात जशा जुन्या वस्तू जाउन नवीन वस्तू येतात तशाच आपल्या घरात देखिल नवीन वस्तू आल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ब्लॅक अँड टिव्ही घ्या त्या जागी आता कलर टिव्ही, नंतर एलइडी, थ्रीडी टिव्ही आला. तसेच आपल्या किचनमधील जुनी भांडी सुद्धा बदलली. पूर्वी काही मातीची, काही पितळ,कासे, तांब्याची होती. त्याची जागा आता स्टेनलेस स्टिल, काचेची आता तर चक्क प्लास्टिकची भांडी आलेली आहेत. स्वस्त आणि दिसायला चांगली असल्याने प्रत्येक ठिकाणी यांचा वापर दिसतो.
पूर्वी जुन्या जानत्या लोकांनी प्रत्येक भांड्याचा शरिराला होणारा फायदा बघून त्याचा वापर आपल्या किचनमध्ये केला असावा म्हणूनच जुन्या भांड्यांमध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतो. ज्याचा फायदा आपल्या शरिराला होतो. म्हणून काही वस्तू ह्या काळ बदलला तरी त्यांची जागा कायम राहायला हवी. पूर्वी औषधी कारखाने, डॉक्टर, मेडीकल नसायची सर्वकाही घरगुती किंवा आयुर्वेदीक जडी-बुटी, नैसर्गिक वनस्पती यांचेच औषध असायचे. त्यातूनच एक घरगुती औषध हे आहे. तांब्यामध्ये असलेले बॅक्टिरीया नाशक गुणधर्मामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी प्यावे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पोटाच्या विकारांवरही गुणकारी आहे. जसे पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी यांना आराम देते.
रोज सकाळी यातील पाणी पिल्याने चेहर्‍यावरिल मुरूम, पुटकुळ्या येउ देत नाही आणि चेहरा चमकदार होतो. आपल्या त्वचे सबंधी समस्या ह्यामुळे दूर राहतात. पोटाचे विकारही यापपासून बर्‍याच प्रमाणात दूर होतात. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे हृदयालाही फायदा होतो. आपल्या शरिरात तयार होणार्‍या बॅक्टिरियाला हे नष्ट करुन आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...