Skip to main content

उन्हापासून बचाव

दररोज आपन पाहतो की  थोडे बाहेरून आले की आपल्याला उन्ह लागले म्हणतो. हे थोड्या प्रमाणात सहनही करतो.  पण त्याचे प्रमाण जास्त असले तर उष्माघात होउ शकतो. उन्हाचा तडाखा विदर्भात सर्वात जास्त असतो. म्हणून तेथेच उष्माघाताचे बळी पडणार असे नाही. इतरही भागात तापमान वाढले आहे.
उन्हामुळे डोके दुखने, ओठ काेरडेे पडणे, अस्वस्त वाटायला लागणे. ही कारणे सुरु होतात.  उन्हाचा त्रास होउ नये म्हण्ून त्यावर उपाय करता येतात. उन्हात थंड पेय प्याले म्हणजे उन्ह लागणार नाही असेही होत नाही. त्याबरोबर आपला उन्हापासून बचावही करणे गरजेचे आहे.
उन्हात बाहेर जायचे असल्यास डोक्यावर जाड रूमाल किवा उन्हापासून बचाव करणारी टोपी घालावी.
उन्हाच्या बचावासाठी छत्रीचा वापर उन्हाळ्यात पण करावा
शरीरावर शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा
उन्हात कष्टाची कामे टाळावीत
उन्हाच्या आधी म्हणजे सकाळीच आपली कामे करावीत
भरपूर पाणी प्यावे.
उष्माघाताची प्राथमिक लक्षणांमुळ सुरुवातीला थकवा व डोके गरगरल्यासारखे वाटते. जीव बैचैन झाल्यासारखा होतो.
अशी प्राथमिक लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जावे.
याचे प्रमाण वाढत जाउन त्वचा कोरडी पडते. अंगात जोराचा ताप भरतो, चक्कर येतो आणि उष्माघाताचा बळी पडतो. उष्माघाताचे वय
स्कर म्हातारी माणसे लवकर बळी पडतात.
त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वत:चा उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे.



Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...